नमस्कार मंडळी,
" कर्दळीवन " या विषयावर आजमितीस भरपूर वाङ्मय बाजारात उपलब्ध आहे. अनेकांनी आपापली पुस्तके काढली आहेत, खास कर्दळीवन यात्रा कंपन्या पण आहेत. लोकांना यात्रेत आलेले अनुभव अशा पुस्तकांमधून वाचायला मिळतात. कोणी कोणी या विषयावर संशोधन करून काही नवीन माहिती प्रकाशित केल्याचा दावाही करतात.
दुर्दैवाने या सर्व पुस्तकांमधील फारच थोडी माहिती शास्त्रशुद्ध असल्याचे वाचताना सतत जाणवते. किंबहुना, दत्त संप्रदायाच्या तत्त्वपरंपरेला धरून आणि सांप्रदायिक मोजपट्ट्यांवर तपासून पाहिलेल्या माहितीचा यात पूर्ण अभावच आहे. भावनिक स्तरावर, कल्पनेच्या विलासातून निर्माण झालेल्या योगायोगाच्या चमत्कारसदृश गोष्टींना, घटनांना " दिव्य पारमार्थिक अनुभूती " म्हणता येत नाही. त्या केवळ भावनाच असतात आपल्या. मग कोणाला स्वामींचे दर्शन होते तर कोणाला दिव्य चैतन्य लहरी जाणवतात. कोणाला शांतता अनुभवाला येते तर कोणाला तेजाचे दर्शन होते. कोणाला सहज समोर आलेल्या एखाद्या श्वानामध्ये दत्तप्रभू दिसू लागतात तर कोणाला अचानकच काही आदेश होऊ लागतात. असल्या अनुभूती श्रद्धेची वाढ करतात असे म्हटले जाते. पण वस्तुत: हे सगळे कल्पनाविलासच असतात. परमार्थाच्या दृष्टीने यांची किंमत शून्य असते.
अशाच शेकडो अनुभवांनी ही सगळी पुस्तके भरलेली आहेत. या घटना परमार्थ तर वाढवत नाहीतच, उलट ज्याला अनुभव येतो त्याचा अहंकार आणि नाही येत त्याचा मत्सर वाढवण्यास कारणीभूत होतात. हे दोन्हीही भक्तीमध्ये फार घातक ठरतात.
या सर्व पार्श्वभूमीवर, कर्दळीवनाची वस्तुस्थिती श्रीदत्तसंप्रदायाच्या विशुद्ध दृष्टीकोनातून प्रथमत: " श्रीवामनराज " या त्रैमासिकाच्या कार्तिक अंकात नुकतीच प्रकाशित झालेली आहे. संत वाङ्मयाचे ज्येष्ठ अभ्यासक व श्रीस्वामी समर्थ महाराज व प. प. श्री. टेंब्ये स्वामी महाराजांच्या परंपरेतील थोर विभूती, प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांनी, श्रीवामनराज अंकातील " कृष्णातिरीच्या वसणाऱ्या" या आपल्या प्रवचनात, सर्वात प्रथम कर्दळीवनाविषयीची खरी माहिती लोकांना उपलब्ध करून दिलेली आहे. सदर माहिती नीट अभ्यासल्यास कर्दळीवनासंबंधीचे अनेक समज-गैरसमज पूर्णत: दूर होतील यात शंका नाही.
" कर्दळीवन " या विषयावर आजमितीस भरपूर वाङ्मय बाजारात उपलब्ध आहे. अनेकांनी आपापली पुस्तके काढली आहेत, खास कर्दळीवन यात्रा कंपन्या पण आहेत. लोकांना यात्रेत आलेले अनुभव अशा पुस्तकांमधून वाचायला मिळतात. कोणी कोणी या विषयावर संशोधन करून काही नवीन माहिती प्रकाशित केल्याचा दावाही करतात.
दुर्दैवाने या सर्व पुस्तकांमधील फारच थोडी माहिती शास्त्रशुद्ध असल्याचे वाचताना सतत जाणवते. किंबहुना, दत्त संप्रदायाच्या तत्त्वपरंपरेला धरून आणि सांप्रदायिक मोजपट्ट्यांवर तपासून पाहिलेल्या माहितीचा यात पूर्ण अभावच आहे. भावनिक स्तरावर, कल्पनेच्या विलासातून निर्माण झालेल्या योगायोगाच्या चमत्कारसदृश गोष्टींना, घटनांना " दिव्य पारमार्थिक अनुभूती " म्हणता येत नाही. त्या केवळ भावनाच असतात आपल्या. मग कोणाला स्वामींचे दर्शन होते तर कोणाला दिव्य चैतन्य लहरी जाणवतात. कोणाला शांतता अनुभवाला येते तर कोणाला तेजाचे दर्शन होते. कोणाला सहज समोर आलेल्या एखाद्या श्वानामध्ये दत्तप्रभू दिसू लागतात तर कोणाला अचानकच काही आदेश होऊ लागतात. असल्या अनुभूती श्रद्धेची वाढ करतात असे म्हटले जाते. पण वस्तुत: हे सगळे कल्पनाविलासच असतात. परमार्थाच्या दृष्टीने यांची किंमत शून्य असते.
अशाच शेकडो अनुभवांनी ही सगळी पुस्तके भरलेली आहेत. या घटना परमार्थ तर वाढवत नाहीतच, उलट ज्याला अनुभव येतो त्याचा अहंकार आणि नाही येत त्याचा मत्सर वाढवण्यास कारणीभूत होतात. हे दोन्हीही भक्तीमध्ये फार घातक ठरतात.
या सर्व पार्श्वभूमीवर, कर्दळीवनाची वस्तुस्थिती श्रीदत्तसंप्रदायाच्या विशुद्ध दृष्टीकोनातून प्रथमत: " श्रीवामनराज " या त्रैमासिकाच्या कार्तिक अंकात नुकतीच प्रकाशित झालेली आहे. संत वाङ्मयाचे ज्येष्ठ अभ्यासक व श्रीस्वामी समर्थ महाराज व प. प. श्री. टेंब्ये स्वामी महाराजांच्या परंपरेतील थोर विभूती, प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांनी, श्रीवामनराज अंकातील " कृष्णातिरीच्या वसणाऱ्या" या आपल्या प्रवचनात, सर्वात प्रथम कर्दळीवनाविषयीची खरी माहिती लोकांना उपलब्ध करून दिलेली आहे. सदर माहिती नीट अभ्यासल्यास कर्दळीवनासंबंधीचे अनेक समज-गैरसमज पूर्णत: दूर होतील यात शंका नाही.
Nice
ReplyDeleteश्रीगुरुदेव दत्त
ReplyDeletei am agree with this
ReplyDeletetrue .
ReplyDeleteGood
ReplyDeleteGood
ReplyDeleteकुठे मिळेल ह्या अंकाची प्रत?
ReplyDelete